आळंदी : माऊलींच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविक तर कॉन्ट्रॅक्टर mjp , pwd ,मुख्य अधिकारी प्रशासन अर्धवट कामाची पूर्तता सद्बुद्धी दे…

आळंदी – माऊलींच्या पालखी सोहळ्याला लाखो भाविक तर कॉन्ट्रॅक्टर mjp , pwd ,मुख्य अधिकारी प्रशासन अर्धवट कामाची पूर्तता सद्बुद्धी दे…
ब्यूरोचिफ – विठ्ठल शिंदे
आळंदी – लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासन पीडब्ल्यूडी मुख्याधिकारी व पोलीस प्रशासनाची सुरू असलेली तारेची कसरत खरंच माऊली यांना सद्बुद्धी दे आणि तात्काळ वारकरी भाविक भक्तांच्या पदरी सेवा सुविधा अपुऱ्या जाणवू देऊ नको हीच आशा माय माऊली चरणी. आज सकाळी जेव्हा वस्तुस्थिती पाहताना डोळ्यांमध्ये भावना वश परिस्थिती निर्माण झाली पाण्याचा प्रवाह हा सुरूच त्यामध्ये एसटीपी ला कनेक्टेड असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम चालू त्यामध्ये पीडब्ल्यूडी चे काम चालू त्यामध्ये लोखंडी पुलाचे काम चालू त्यामध्ये घाटाचे काम चालू या सगळ्यांचा मेळ बसवता बसवता अधिकारी वर्ग यांची दमछाक झालेली पाहून मनाला जाणीव होऊ लागली की वारी अख्खी काही दोन-चार दिवसाच्या फरकावर आली आणि त्यातवरून राजाचा प्रवाह सुरू त्यामध्ये वारकऱ्यांची आगमन सुरू त्यात कॉन्ट्रॅक्टदाराची परिस्थिती बघून स्वतः कॉन्टॅक्टर म्हणतायेत मनोज राठी मी माझ्या परीने खूप प्रयत्न त्रास करत आहोत मलाही हे काम 16 तारखेच्या आत मी तुमच्या हातात देणार आहोत मात्र येणाऱ्या अडचणींचा सामना करताना मीही हदबल होत आहे तेव्हा मला प्रश्न हा पडलेला आहे. की तुम्ही आधी जागृती करून याबाबत कार्य सुरू का केले नाही. आता ऐन वेळेला येणाऱ्या वारकरी भाविक भक्तांच्या सोयी सुविधांमध्ये तुम्ही बाधा का बनवत आहात… जर तुम्हाला ज्ञात होतं की ही तितक्या कालावधीमध्ये होत नाही… तर आपण कार्य का सुरू केले. सुरू केले तर ते तात्काळ करण्याची जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेचीच आहे. त्या बाबत कुठे कमी पडता कामा नये ही जबाबदारी प्रशासकीय यंत्रणा प्रखरपणे पाहताना दिसतायेत मात्र निभवताना त्या ठिकाणी कर्मचारी अपुरे दिसतात हेच फार मोठे दुर्दैवी त्याठिकाणी कार्य तत्परतेला सव्वाशे कामगार करता येत असं वाटतंय असं लेखी स्वरूपात असू शकतं मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्या ठिकाणी ती जाणीव नाही होत. मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जे खालचे घाटाचे काम सुरू आहे ते कुठल्याही परिस्थितीत उद्या संध्याकाळपर्यंत भक्ती सोपांन पुल आहे तिथपर्यंत पूर्ण कम्प्लीट करून घेण्याची आदेश दिलेले आहेत. तसेच आळंदी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके साहेब यांनी सुद्धा या संदर्भात पाहणी करून त्यांनी सूचक मार्ग सांगितलं की भाविकांना येण्या-जाण्यासाठी जो भक्ती सोपान पूल आहे त्याही ठिकाणी दर्शनबारीची पूर्तता करा परंतु दुसरीही सुविधा ती पूर्तता करा जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्याला योग्य वेळी योग्य नियोजन करण्यास मदत होईल असे तात्काळ कार्य करून घ्या असे आदेश दिले.
इंद्रायणी नदीचे पाणी वारंवार वाढत असल्याने या कामांमध्ये अडथळा निर्माण होत आहे तो समय सुचकतेनुसार मॅनेजमेंट करून त्या ठिकाणची व्यवस्था पूर्ण करण्याचा प्रयास प्रशासन करत आहे मात्र त्या कार्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होऊ नये अशी अपेक्षा सरकारी अधिकारी प्रशासन यांना वाटत आहे.
आळंदी मध्ये या इंद्रायणी घाटावर सुरू असलेले काम आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे शब्द पुढीलप्रमाणे …..यातील कोणतेही काम नगरपालिका करत नाही.
१. ड्रेनेज लाईनचे काम mjp करत आहे.
2. ब्रिज चे PWD करत आहे
आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी याबाबत केलेले वक्तव्य रास्त वाटते का? आळंदी मध्ये येणाऱ्या भाविकांची जबाबदारी कोण घेणार? आळंदी नगरपरिषद च्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची पूर्तता कुठे कमी पडू शकणार नाही का याची जबाबदारी स्वीकारणार का? आरोग्याच्या दृष्टिकोनातून आळंदी शहरांमध्ये मच्छरांची खूप वाढ झालेली आहे त्यामध्ये धूर फवारणी संपूर्ण होईल का? इंद्रायणी घाटावर असलेल्या परिस्थितीमध्ये किती दिवसात उत्तमरीत्या बदल होऊ शकेल का? वारी काळात लाईटच्या खांद्यावरील असलेले फ्लेक्स बोर्ड अतिक्रमण विषयी कारवाई होईल का? आळंदी शहरात जाता येताना लगत दिसणारे खड्डे व ड्रेनेज लाईन फुटलेल्या चेंबर्स ची कामे त्वरित पूर्ण होऊ शकतील का?
सांगा ना माऊली लाखो वारकरी आळंदी तीर्थक्षेत्रात येणार आहेत त्यांच्या सोयी सुविधा प्रशासनाने पूर्ण करणे अति महत्वपूर्ण आहे त्याबाबत लक्ष केंद्रित करून प्रशासकीय यंत्रणेने त्वरित कार्य संपूर्ण करावी अशी आशा लाखो भाविक जनता अपेक्षित करतात.
लाखो भाविक वारकरी आळंदी तीर्थक्षेत्र या ठिकाणी येतात आणि आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात त्यांच्या सुरक्षेसाठी 200cctv बसवण्याची जबाबदारी प्रशासनाने पूर्ण केली का? शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेणे अति महत्वपूर्ण आहे ती टीम पूर्ण कार्यरत आहे का?