आळंदी नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 स्वयंसहायता बचत गट क्षमता बांधणी प्रशिक्षण

आळंदी नगरपरिषद स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 स्वयंसहायता बचत गट क्षमता बांधणी प्रशिक्षण
विठ्ठल शिंदे
आळंदी नगरपरिषद व कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अंतर्गत स्थापन केलेल्या महिला बचत गटातील एकूण 55 महिलांचे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मा. माधव खांडेकर, मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली दि. 11 जून 2025 रोजी वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडले.
सदर एकदिवसीय कार्यशाळे मध्ये महिलांना उपजिविकेची करीता केंद्रीकृत सुका कचरा प्रक्रिया केंद्र चालवणे, पुनर्वापरयोग्य वस्तू कच-यात न जाऊ देता त्याचे वेगळे संकलन करून दुरुस्ती व विक्री करणे, इ-कचराचालविणे, कपड्यांचे कच-याचा पुनर्वापर, बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया व उत्पादन, खतनिर्मिती (कंपोस्टिंग + बायोगॅस, फुलांच्या निर्माल्यापासून (वापरलेल्या फुलांपासून अगरबत्ती बनविणे व जुन्या कपड्यांपासून विविध प्रकारचे पॉकेट, पर्स, पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यवसाय विषयक मार्गदर्शन व बाजारपेठ कशी उपलब्ध करता येईल याबाबत माहिती देण्यात आली.
तसेच या एकदिवसीय कार्यशाळे करीता मा. माधव खांडेकर, मुख्याधिकारी, श्रीमती. पायल कापरे, तुषार जोशी, कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन पुणे, श्रीमती. वैशाली पाटील, सा. प्रकल्प अधिकारी, श्री. शशांक कदम, शहर समन्वयक, यांनी मार्गदर्शन केले व सदर एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीतेसाठी श्री. अर्जुन घोडे, समुदाय संघटक, श्रीमती. सुवर्णा काळे, अध्यक्ष शहर स्तर संघ आळंदी, श्रीमती सोनाली रत्नपारखी यांनी परिश्रम घेतले